Tuesday 24 December 2013

अभ्यास कसा करावा?

अभ्यास कसा करावा?
आपण ज्यांना टीनएजर्स असे संबोधतो किंवा कीशोरवयीन मुलं म्हणतो- म्हणजे १३ ते १८ या वयोगंटातील मुले व अभ्यासांचा कंटाळा करणारी. मुले यांना वीचारले तर तीना इच्छा वीचारल्यात तर मी देखील सांगेन- परीक्षा, अभ्यास नावांचे राक्षस.

शिक्षकांनी आमच्याशी मीत्राम्रपाणे वागावे आणि शाळेत जाणे म्हणजे पिकनीक ला गेल्या सारखे वाटणे असे १४ वर्षाची सरीता सांगते.

सर्वसाधारणपणे किशोरवयीन मुले अभ्यांसाचा कंटाळा करतात.अभ्यास न करण्याची कारणे ती शोधत असतात. "माझ पोट आज दुखतंय मला आज बर वाटंत नाही किंवा मला सगळ येतयं. वैगरे बहुतेक वाक् आईवडीलांना आपल्या मुलांकडुन ऎकायला मिळतात.

खुप अभ्यास करुन परीक्षेत चांगले यश मिळवणे हे मुलांच्या योग्य वाढीचे द्योतक आहे. अभ्यास न करणारी मुले आणि त्यांना अभ्यांसाला जबरदस्तीने बसवणारी पालक मंडळी या दोघांच्या वादविवादाने घरांच वातावरण पार बिघडुन जाते. म्हणुनच मुले का अभ्यास करत नाहीत, याची कारणे आपण अभ्यासली पाहीजेत.

१. अभ्यास करणे हे मुलांना कंटाळवाण वाटतं.बऱ्याचदा अभ्यासक्रम भरपुर असतो आणि अ अभ्यास आणि आपल्याला एवढा प्रंचड अभ्यास करायचा आहे, हे पाहुनच मुलांचा अभ्यासातला रस संपतो.

२. आमचे शिक्षक आम्हाला निट शिकवत नाहीत. किशोरवयीन मुलांना शिकवण्यात येणारे अनेक विषय असतात. ते योग्य रीतीने शिकवले तरच मुलांना रस वाटतो.

३. पाठांतराचा तीटकारा- अनेक मुले न समजताच धडाधड पाठंतर करतात. पण मध्येच एखादा विषय शब्द कींवा वाक्य विसरल तर प्रश्नाला उत्तर देणं त्यांना कठीण जातं. त्यामुळेच त्यांना परीक्षेत कमी मार्क मीळतात. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी लागणारा आत्मवीश्वास ते गमावतात.

४. अभ्यास करणे महत्वाचे आहे असं मला वाटंत नाही. बऱ्याच मुलांना अभ्यासांच महत्वच पटलेल नसतं.पालकांना वाटत असंत की, आपल्या मुलानी अभ्यास का करायचा हेच माहीत नसंत. आणि हेच माहीत नसल्याने त्यांचे अभ्यासांत लक्ष लागंत नाही.

५. "माझे आई-वडील माझ्याकडुन अति अपेक्षा करतात." अस अनेक मुलं म्हणतात. आई-वडीलांच्या अति अपेक्षामुळे मुलांवर दडपण येतं. मुले एकाग्र बनु शकत नाहीत. (या ठीकाणी सद्या चालु असलेल्या ’घरोघरी’ या उत्क्रुष्ट नाट्काची सहजच आठवंण यावे.)

६. काही वेळा मीत्रांच्या संगतीने , आई-वडील घटस्फोटीत आहेत, व्यसनी आहेत , एकमेंकाशी सतत भांडत असतात, मुलांला देखील सतत मारहाण करत असतात, त्याने मुलं अभ्यासात मागे पडतात.

७. काही वेळा मीत्रांच्या संगतीने अभ्यास करण्यांच मुलं टाळतात. अभ्यास आपल्या मीत्राला आवडत नाही, म्हणुन त्यांना पण आवडत नाही. कारण आपण जर का अभ्यास मधे रस दाखवला तर ग्रुप मधे बाहेर फेकले जावु अशी त्यांना भीती असते. 

अभ्यासांने प्रत्येक व्यक्त्तीचा मनाचा, बुध्दीचा मोठया पमाणावर विकास होतो.आपल्या आजुबाजुच्या वातावरणांची माहीती होते, ते समजुन घेता येते. स्व:ताच्या प्रगतीसाठी अभ्यासाची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणुन किशोररवयात हे अभ्यास तर भरपुर करतात. पण त्यानी त्यांचा अभ्यास कसा करतात याचा नोंदी पण दीलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना आपला अभ्यास नक्कीच सुधारता येईल.

१. तुमचे अभ्यासाचे टेबल, टीव्ही, स्वयंपाकघर हे ट्रँफिक्च्य आवाजापासुन दुर असायला हवे. टेबलावर काँमीक्स व गोष्टीची पुस्तके नसावीत.

२. शक्य असेल तर अभ्यासाची एक ठरावीक वेळ असावी, म्हणजे त्या वेळेत अभ्यासात तुमंच मन एकाग्र होण्यास मदत होईल. रविला रात्री दहानंतर अभ्यास करायला आवडतं. कारण त्यावेळी सर्वजण झोपलेले अस्तात आणि सर्वत्र शांतता असते.

३. सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती ४५ मीनीटं ते १ तास एकाग्र राहु शकते. त्यानंतर एकाग्रता भंग होवु लागते. म्हणजेच जेव्हा एखादा किशोर वयीन मुलगा एकच पाठ एक तासापेक्षा जास्त वेळ वाचत असतो. तेव्हा त्याची स्मरण करणे त्याला कठीण जांत. त्याही पेक्षा जेव्हा मुलगा तीन तास सलग अभ्यास करीत असतो. तेव्हा त्यांची स्मरण्शक्त्ती कमी होते. आणि तो अधिक विस्मरणशील होतो . म्हणुनच कीशोरयीन मुलांनी सर्वसाधारणपणे तासभरच अभ्यास करायला हवा. त्यानंतर १०-१५ मीनिटांचे मध्यंतर घेऊन मग पुन्हा अभ्यासाला सरुवात करावी. यामुळे स्मरणशक्ती ताजीतवानी राहते आणि अभ्यासक्रम चटकन लक्षात यायला मदत होते.

४. छोट्या मंध्यतराप्रमाणे मुलांनी काही काळ खेळण्यात, मीत्रांशी गप्पा मारण्यात, टीव्ही बघण्यात घालवला पाहीजे. यामुळे मुलांना जीवनावीषयी आस्था वाटते आणि अभ्यास करताना उस्ताह येतो.

५. रोज अभ्यास करायची सवय ठेवा, म्हणजे परीक्षेच्या वेळी ताण जाणवार नाही.

६. एखादा धडा वाचताना तो नेमका कशाबद्दल आहे ते जाणुन घ्या.त्यातील मुद्याची शीर्षके, धड्याची प्रस्तावना आणि सारांश नीट वाचा. यामुळे धड्याची नीट ओळख होते.

७. वाचुन झाल्यांनंतर पुस्तक बंद करुन, तुम्ही जे वाचंल आठवण्याचा प्रयत्न करा. केलेला अभ्यास लिहुन काढणे सर्वात उत्तम. त्यामुळे तुम्ही तुमची उत्तरे आधीक चांगल्या तर्हेने लीहु शकता. आणि तुमचा गोंधळ उडत नाही. शिवाय लीखाणामुळे तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहतो. शिकण्याची क्षमता ही माणसाला मीळालेली महान देणगी आहे. तिचा उपयोग करा. आणि आयुष्यात यशस्वी व्हा.

परीक्षेचा अभ्यास आणि एकाग्रता

परीक्षेचा अभ्यास आणि एकाग्रता

परीक्षा जवळ येत चालल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येत नाही. एकाग्रता म्हणजे सोप्या शब्दात सर्व ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे.

अभ्यास करताना ज्ञानेन्द्रीयान्द्वारे माहिती स्वीकारली जाणे.ती मेंदूत साठवली जाणे. आणि आवश्यक तेंव्हा आठवून चांगल्या पद्धतीने सादर करता येणे. ह्या क्रिया चांगल्या होणे व त्यांच्यात coordination असणे, फार महत्वाचे आहे.
अभ्यासातील एकाग्रता का होत नाही तर मुख्यत: – ध्येयासक्ती नसणे, योग्य ध्येयच डोळ्यासमोर नसणे, भावनिक समस्या असणे, अभ्यास करायची मनापासून तयारी नसणे, विषयामधे रस नसणे, विषय अवघड वाटणे, शारीरिक व मानसिक थकवा असणे.
मुळात मन स्वस्थ , स्थिर नसेल तर एकाग्रता साधणं शक्य नाही. त्यासाठी मन अस्वस्थ असण्याची कारणे जी आपल्याला माहित आहेत, त्यांची एक लिस्ट करावी. विश्वासातील घरातली व्यक्ती किंवा तज्ञ ह्यांच्या मदतीने त्यांचे निराकरण करावे. जी कारणे सांगता येत नसतील, उमजत नसतील त्यांच्या निराकरणासाठी तज्ञांचे सहाय्य घ्यावे. भावनिक समस्या (emotional disorder ) किंवा अस्वस्थता असेल तर त्यासाठी देखील वेळ न दवडता तज्ञांचे उपचार घ्यावेत.
अभ्यासाला बसताना अभ्यास चांगला होईलच हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन सुरवात करावी.
अभ्यासासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे. रोजच्या अभ्यास नियोजनात साधारण ५० मिनिटे झाल्यावर पाच-दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा. त्यानंतर काही क्षण श्वासावर लक्ष ठेऊन शांत बसावे. त्यानंतर पुढचा अभ्यास करावा. अभ्यास करताना मनात इतर विचार आल्यास स्वत:ला स्टोंप इट, रिल्याक्स, बी हियर नाऊ इत्यादी स्वयं सूचना द्याव्यात. मन वर्तमान क्षणात ठेवण्यास त्याचा उपयोग होईल.
रोजच्या अभ्यासाची आखणी करताना साध्य होऊ शकेल इतपतच अभ्यासाची योजना आखावी व तो पूर्ण करावा. अभ्यास करताना सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. अभ्यासाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल परंतु S3RQ अशी पद्धत वापरून पहावी. म्हणजे जो अभ्यास आत्ता करायचा आहे प्रथम त्याचं सर्व साधारण अवलोकन(Survey), काळजीपूर्वक वाचन(Read), त्यातील महत्वाचा भाग लक्षात ठेवत उजळणी (Revise), त्यानंतर महत्वाचे म्हणजे जो अभ्यास केलाय तो समोर एक काल्पनिक व्यक्ती आहे असे मनात आणून तीला समजेल अशा पद्धतीने, पुस्तकात न बघता, मोठ्याने बोलून शिकवणे(Recite). ही गोष्ट महत्वाची का तर , आपला खरंच अभ्यास झालाय की नाही, आपल्याला समजलंय की नाही ह्याची चाचणी होते. ह्या शिकवण्यात अडलं तर मधूनच पुस्तक/नोट्स refer करायला हरकत नाही. पण आत्मविश्वास येईपर्यंत पुन्हा पुन्हा शिकवावे. ह्याने चांगल्या रीतीने लक्षात राहायला मदत होते. त्यानंतर काही कालांतराने स्वत: प्रश्न काढून उत्तरे लिहिण्याचा सराव करावा.
कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास रोज काहीवेळ करावाच. काही विषय आवडत नसतील तर त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा. माझ्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास आवश्यक आहे हे मनाला बजावावे.
एकाग्रता कमी होतेय असं वाटलं की पुढचा अभ्यास करणं काहीवेळ थांबवून, झालेला अभ्यास पुन्हा आठवावा. काही दीर्घ श्वास घेवून सावकाश सोडावे. स्वत:च्या श्वासाकडे , शरीराकडे, वेगवेगळ्या ज्ञानेन्द्रीयांना जाणवणाऱ्या संवेदनांकडे क्रमाक्रमाने त्रयस्थपणे पहावे. काहीवेळ स्वत:चा श्वास पहावा. मन अशा पद्धतीने divert व relax करावे. वाटल्यास थोड्या वेळ शारीरिक हालचाली कराव्यात, खोलीतल्या खोलीत चालावे. पुन्हा पुढच्या अभ्यासाला सुरवात करावी.
पूर्वी आपला ज्यावेळी खूप छान एकाग्रतेने अभ्यास झाला होता त्यावेळची मन:स्थिती वारंवार आठवावी व त्या धारणेने अभ्यासाला बसावे.
रोज चल पद्धतीचा व्यायाम (धावणे,वेगात चालणे, पोहोणे इ.) करणे आवश्यक आहे. ज्यायोगे मेंदूतील पेशींना मुबलक प्राणवायू मिळेल. चांगली संप्रेरके स्त्रवतील . ज्याचा एकाग्रतेवर चांगला परिणाम होईल.
चौरस, पौष्टिक आहार वेळेवर घ्यावा. भरपूर फळे, भाज्या, ओमेगा ३ युक्त, व्हिटामिन बी,सी,ए, इ,लोह युक्त पदार्थ.
रोज ओमकार करणे, थोड्यावेळ शांत संगीत ऐकणे ह्याचाही एकाग्रतेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
अभ्यास करण्याची जागा शक्यतो एकच असावी. तिथे शक्यतो मोबाईल, टी.व्ही. इत्यादींचा अडथळा नसावा. बसूनच अभ्यास करावा (पाठीचा कणा ताठ राहील अशा पद्धतीने). पलंगावर लोळत अभ्यास करू नये. पलंग ही फक्त झोपण्याची,आराम करण्याची जागा आहे.
ठरवलेला अभ्यास पूर्ण झाला तर आणि तरच स्वत:ला थोडा वेळ टी.व्ही.इ. मनोरंजनासाठी परवानगी द्यावी.
परीक्षा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न नसून, मेंदूसाठी, आपल्यासाठी, ठराविक वेळेत अभ्यास करून स्वत:ला सिद्ध करण्याची, ती एक संधी आहे हे लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यामध्ये नवीन दृष्टीकोन तयार होण्याची, विश्लेषणाची, समजून घेउ शकण्याची, लक्षात ठेवण्याची आणि चांगल्या रीतीने सादरीकरणाची, ह्या क्षमता निर्माण होण्याची ती एक संधी आहे.

Saturday 12 October 2013

सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य

‘सध्याच्या काळात विध्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यातून शिक्षक जर साधना करणारा असेल, तर त्याला हे सहज शक्य होते. मात्र काळानुरूप ही शिक्षणव्यवस्था भारतीय संस्कृतीतून नष्ट होत गेली. सध्याची शिक्षणपद्धत ही पाश्चात्यांच्या विचारांवर आधारलेली आहे. हे लक्षात घेऊन ‘सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य’ यात होत गेलेले पालट एका शिक्षिकेने लिहिलेल्या लेखाद्वारे पुढे देत आहे.

आश्रमातील सात्त्विकतेचा लाभ विद्यार्थी आणि आचार्य या दोघांनाही होणे 
        पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात होती. त्यामध्ये विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उत्तरदायित्वही आचार्यांवर होते. विद्यार्थी गुरुगृही राहून शिक्षण घेत असत. ‘आचार्य देवो भव’ अशीच प्रतिमा विध्यार्थ्यांच्या मनात सिद्ध होत होती. त्यामुळे आचार्य हे स्वतः साधना करणारे असल्याने विध्यार्थ्यांवरही तसेच संस्कार होत असत. त्याशिवाय आश्रमातील सात्त्विकतेचा लाभ विद्यार्थी आणि आचार्य या दोघांनाही होत असे.

शालेय पद्धतीत होत गेलेले पालट
शाळेत मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना असणे : प्रारंभीच्या काळातशाळेत शिकवणार्‍या शिक्षकांच्या साध्या रहाणीमानाचा आणि विचारांचा आदर्श विध्यार्थ्यांसमोर होता. त्यांचे सात्त्विक आचार, विचार विध्यार्थ्यांना अनुकरण करण्यास योग्य होते. त्यामुळे शाळेत गेल्यावर आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना होती.
‘संस्कार, धर्माचरण’ हे शब्दच समाजामधून लोप पावत चालल्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात अधःपतन हाणे : जसजसा शिक्षणामध्ये पाश्चात्यांचा प्रभाव पडत गेला, तसतसा शाळेतील शिक्षकांमध्येही पालट होत गेला. पुढच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या. त्यामुळे शिक्षकांना ‘सर, मॅडम’ म्हणवून घेण्यातच धन्यता वाटू लागली. त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांमध्येही अशाच प्रकारचे संस्कार होतांना दिसत आहेत. ‘संस्कार, धर्माचरण’ हे शब्दच समाजामधून लोप पावत चालल्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात अधःपतन होतांना दिसते.

इतर धर्मीय विध्यार्थ्यांची शालेय स्थिती 
        इतर धर्मीय विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्थाही केली जाते. मात्र हिंदु समाजाला अशा प्रकारचे धर्मशिक्षण दिले जात नाही.

सामाजिक स्थिती 
        या धावपळीच्या युगात अशी संस्कारक्षम पिढी निर्माण न होण्याची अनेक करणे आहेत. आई-वडिलांना चाकरीमुळे मुलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. विभक्त कुटूंबपद्धतीमुळे घरात संस्कार करणारे आजी-आजोबाच नाहीत. त्यामुळे मुले लहान असतील, तर पाळणाघरात ठेवली जातात किंवा घरात बसून दूरदर्शनवरील कार्यक्रम बघण्यात ती आपला वेळ घालवतात. यामध्ये त्यांना चांगले-वाईट सांगणारे कोणीही नसते.

राजकीय परिस्थिती 
        पूर्वीच्या काळी राजेसुद्धा धर्माचरणी असल्याने ते ऋषीमुनींच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करत; पण सध्याचे राज्यकर्ते हे धर्माचरणी नसल्याने हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यास सक्षम नाहीत. शिक्षण संस्था या राज्यकत्र्यांच्याच मालकीच्या असल्याने त्यातून संस्कारक्षम विद्यार्थी तर सोडाच, चांगले परीक्षार्थी घडण्याची अपेक्षाही आपण करू शकत नाही.

सध्याची शिक्षण पद्धती 
        प्रचलित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्याला शिकण्यातील आनंद मिळण्यापेक्षा कटकटीच जास्त भेडसावू लागल्या आहेत. त्याही पुढे आता पाठ्यपुस्तकातून वास्तवताच लोप पावत चालली आहे. त्यामुळे त्यांतून विध्यार्थ्यांवर संस्कार होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत जर हिंदु संस्कृती टिकवायची असेल, तर शिक्षकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरते. भावी काळात शिक्षक जर साधक झाला, तर समाजाला संस्कारक्षम शिक्षण तोच देऊ शकतो. मग शिक्षकाने साधक व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे ?
दैनंदिन जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधून त्यावर उपाय सांगणे, म्हणजेच साधना शिकवणे : अभ्यासक्रमाचे तात्त्विक अंग शिकवून विध्यार्थ्यांना आनंद मिळू शकत नाही. त्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकरण करावे. दैनंदिन जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधून त्यावर उपाय सांगणे, म्हणजेच साधना शिकवणे.
धर्माचरण आणि साधना : स्वतः नियमित धर्माचरण आणि साधना करून विध्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करावा. विध्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने साधना समजावून सांगण्याइतपत पुरेसे ज्ञान शिक्षकाला असले पाहिजे.
अभ्यासू वृत्ती : सतत सत्य जाणून घेण्याची इच्छा आणि त्यासाठी अभ्यासू वृत्ती बाळगणे
कृती : संस्कार करण्यासाठी केवळ उपदेश न करता कृतीतून शिकवणे

संस्कार आणि धर्माचरण शिकवण्यासाठी काही उपक्रम
अ. वर्गाच्या ग्रंथालयात संस्कार करणार्‍या आणि धर्मशिक्षण देणार्‍या पुस्तकांचा समावेश करणे
आ. शाळेच्या प्रशासकीय वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत संस्कारवर्गांचे आयोजन करणे
इ. पालकसभांचे औचित्य साधून पालकांशी विध्यार्थ्यांच्या प्रगतीसह संस्कार, धर्माचरण, तसेच साधना या विषयांवर चर्चा करणे
ई. शाळेतील बालसभांमधून (जयंती, पुण्यतीथी, इतर विशेष दिवस) धर्माचरणी व्यक्ती, संत, साधक यांचे मार्गदर्शन विध्यार्थ्यांना मिळण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करणे
उ. आपल्या सहकारी शिक्षकांना साधना सांगणे आणि दैनंदिन उपक्रमात त्यांचे सहकार्य घेणे
ऊ. कार्यानुभव सारख्या विषयांत देवालयांची स्वच्छता, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे, यांसारखे उपक्रम घेणे
        एवढ्या गोष्टी जर शिक्षकाने केल्यास विद्यार्थी आणि समाज सुसंस्कारीत होऊ शकतो. यातून शिक्षकाची समष्टी साधना होऊन ऋषीऋण आणि समाजऋण फेडले जाऊन तो ईश्वरी कृपेस पात्र ठरेल.’
-

Sunday 22 September 2013

बालकांचे खेळ :
 बालकाच्या मनावर खेळाची आवड कोणी बाहेरून लादलेली नसते; तर ती स्वयंस्फूर्तच असते. ही उपजत आवड मुलाला एका जागी स्वस्थ बसू देत नाही. त्याला काहीतरी हालचाल करायलाच लावते. जी हालचाल प्रिय, ती हालचाल मूल वारंवार करते. तसेच प्रौढांचे अनुकरण करण्याची प्रवृत्तीही मुलांमध्ये जात्याच असते. या हालचालीतून व अनुकरण-प्रवृत्तीतून खेळाचा जन्म होतो. अशा रीतीने क्रीडेकडे मुलांची स्वाभाविक ओढ असते. क्रीडा ही सर्जनात्मक सहजप्रवृत्तीतून निर्माण होणारी नैसर्गिक क्रिया आहे. प्राणिमात्रांमध्ये ती कमीअधिक प्रमाणात दिसून येते. शिकण्याची वृत्ती अधिक असलेल्या प्राण्यांत क्रीडाप्रवृत्तीही अधिक दिसते. क्रीडेतील निर्माणक्षमता ही आनंददायी असते. त्याचमुळे आबालवृद्ध खेळात रमतात. कर्तृभाव म्हणजे कर्तृत्व गाजवण्याची इच्छा, ही मुलांना खेळाकडे खेचत असते. खेळ म्हणजे मुलांच्या शिक्षणाची निसर्गाने केलेली व्यवस्थाच होय. मुलांची वाढ त्यांच्या खेळावरच अवलंबून असते. खेळ हे मनाच्या व शरीराच्या निरोगीपणाचेच लक्षण होय. खेळापासून त्यांना परावृत्त केले की, ती स्वाभाविक चिडखोर, तुसडी व एकलकोंडी बनतात. मूल खेळत नसेल तर ते निरोगी नाही, त्याच्यात जन्मजात विकृती आहे, असे मानसशास्त्र मानते.

खेळांचे अनेकविध प्रकार आहेत. त्यांत वयोमानानुसार शिशुगटाचे, बालकांचे, कुमारांचे, तरुणांचे, प्रौढांचे, वृद्धांचे असे नानाविध प्रकार आढळून येतात. प्रस्तुत नोंदीत बालकांच्या म्हणजे साधारणपणे दोन ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या खेळांचाच विचार फक्त अभिप्रेत आहे.
 
डीच ते पाच वर्षांच्या मुलांना बदलत्या हालचाली करणे आवडते. त्यांना नावीन्याची गोडी असते. स्वच्छंदपणाने बागडणे, खाली डोके आणि वर पाय करणे, कोलांट्या उड्या मारणे, लंगडी घालणे वगैरे खेळ ही मुले खेळतात. मुले मोठी होऊ लागली, की त्यांची कल्पनाशक्ती व चैतन्यशक्ती वाढते. या अतिरिक्त शक्तीला मोकळी वाट करून देण्याचा खेळ म्हणजे एक मार्ग असतो. कल्पनाशक्तीमुळेही मुले प्रौढांचे अनुकरण करू लागतात. उदा., ⇨ बाहुलीचा तसेच भातुकलीचा खेळ. तसेच ती नवनवीन रचना करू लागतात. उदा.,मेकॅनोचा खेळ, लहान तिचाकी सायकलवर बसून प्रौढाप्रमाणे मोटार चालविण्याचा आव आणणे, काठीचा घोडा-घोडा करणे, आगगाडीप्रमाणे झुक्-झुक् आवाज करीत पळणे इत्यादी [⟶ खेळणी]. उद्यानात गेल्यावर ही मुले घसरगुंडी, झोके,‘सी-सॉ,’‘पिरॅमिड’,‘मेरी-गो-राउंड’ यांसारख्या क्रीडासाधनांच्या साहाय्याने खेळतात. कालांतराने ह्या खेळातही त्यांना स्वारस्य वाटत नाही. आठ ते बारा वर्षांपर्यंत त्यांची शारीरिक उंची वाढू लागते आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडींमध्येही फरक पडतो. शौर्याचे, कौशल्याचे खेळ त्यांना आवडू लागतात. त्यामुळे मुले आपापसांत मारामाऱ्यांचे खेळ, लुटुपुटीच्या लढाया व शिकारीचे खेळ खेळतात. त्यातून नकळत भावी आयुष्यासाठी त्यांची बचाव व आक्रमणाची पूर्वतयारीच होत असते. याच काळात ईर्षा व स्पर्धा या वृत्तीही वाढीस लागतात आणि मुले रस्सीखेच, कुस्ती हे खेळ अधिक पसंत करतात. रांगत्या वयात फिरता भोवरा पाहण्यात मौज वाटत होती, आता त्यांना आपल्या हातांनी ⇨भोवरा फिरवल्याशिवाय चैन पडत नाही. काही मुले ⇨पतंगाचे पेच घालू लागतात, तर त्याचवेळेला इतर मुले कुस्तीचे पेच सोडवतात. पूर्वी चेंडूशी खेळणारी मुले आता क्रिकेटचे धडे गिरवू लागतात. मुलींचे मन सागरगोटे, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, फुगडी, नृत्य यांसारख्या खेळांकडे नैसर्गिक रीत्याच आकृष्ट होते.
 
शा रीतीने तान्ह्या मुलाला खुळखुळा, रांगणाऱ्याला भोवरा, उभे राहणाऱ्याला पांगुळगाडा, दंगेखोर मुलाला चाक फिरवणे, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करणे व गाडा ओढणे या खेळांबद्दल ओढा वाटू लागतो आणि या खेळांतूनच बालकांचे वय वाढत असते. भोवतालच्या परिस्थितीशी संबंध येताच मुलाला लाकडी घोड्यावर बसण्यात गोडी वाटत नाही, तर तो खऱ्या घोड्यावर बसण्यासाठी धडपडतो. हळूहळू वाढत्या वयातील खेळांत नियमबद्धता, व्यवस्थितपणा येऊ लागतो.
 
ल्ली शिक्षणात खेळांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे दोन ते बारा या वयोगटांतील मुलांना त्यांच्या मनोवृत्तींनुसार निरनिराळे खेळ शिकविले जातात. साधारणपणे पाच वर्षांच्या मुलामुलींना एकत्रित टाळ्यांचे खेळ, सांघिक गाणी व छोटी छोटी नृत्ये शिकवली जातात. सहाव्या वर्षी टिपरी, लेझीम यांसारखे खेळ; तर सातव्या वर्षी लेझीमचे पुढचे हात, कवायती व अधिक कौशल्ययुक्त नृत्ये शिकवली जातात. या शैशवावस्थेत तालबद्ध व गतिमान खेळांची मुलांना स्वाभाविक आवड असते. आठव्या-नवव्या वर्षापासून मात्र मुलांना चुरशीच्या स्पर्धात्मक खेळांची गोडी लागते. अशा रीतीने चौथ्या इयत्तेत म्हणजे साधारणतः आठव्या वर्षापासून मुले स्पर्धात्मक खेळ चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या वयात मुलांना काठीच्या कवायती व संचलने, नमस्कार,⇨योगासने व अन्य व्यायामप्रकार वगैरेंचे शिक्षणही दिले जाते. याचवेळी मुलांचे संघ करून त्यांना नियमबद्ध चुरशीचे सांघिक खेळ शिकवले जातात.

       धोनीने उघड केलं विजयाचं गुपित!


इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसतोय. एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची १५ टक्के भागीदारी आहे.
पाहा व्हिडिओ- http://goo.gl/gqeef

 


team-d

तिरंगी एकदिवसीय मालिकेतील अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताला शेवटच्या षटकात विजय मिळवून देणाऱ्या 'कॅप्टन कूल' धोनीने टीम इंडियाच्या विजयाचं गुपित अखेर उघड केलं आहे. 'कमी धावसंख्येचा पाठलाग करताना, कधी कधी कंटाळवाणं (बोरिंग) क्रिकेटही खेळावं लागतं, पण यामुळेच टीमचा विजय निश्चित झाला.' असं धोनी म्हणाला.

धोनी म्हणतो, 'मी ४९ व्या षटकामध्ये एक-एक धाव काढण्यापासून स्वत:ला रोखत होतो. जर मला शेवटचा चेंडू खेळावा लागला असता आणि मी जर एक धाव काढू शकलो नसतो, तर मात्र इशांतवर दबाव वाढला असता त्यामुळे मला शेवटच्या षटकात स्वत:लाच धावा कराव्या लागणार होत्या हे स्पष्ट होतं.'

धोनीने आपल्या तळाच्या फलंदाजांचे मात्र कौतुक केलं आहे. 'तळाचे फलंदाज जास्त धावा करू शकले नाही. मात्र त्यांनी अनेक चेंडूंचा सामना केला आणि हेच फार महत्त्वाचं होतं. यात सगळ्यात जास्त श्रेय हे भुवनेश्वरला जातं, त्याने जवळजवळ मलिंगाच्या १० चेंडूंचा सामना केला. त्यामुळे मागील फलंदाजांना त्याच्या चेंडूंचा सामना करावा लागला नाही. हा सामना फारच उत्कृष्ट होता.' तळाच्या फलंदाजांच्या साथीमुळे हा विजय साकारल्याचे धोनी मान्य करतो.

धोनीने सलामीवीर रोहित शर्माचेही कौतुक केलं आहे. त्याच्या कामगिरीवर धोनी खूश असल्याचे सांगतो. 'रोहितचे प्रदर्शन पाहून फार चांगलं वाटलं. मात्र काही फटके मारताना त्याने स्वत:ला आवर घालायला हवा. तो जेव्हा धावा करतो, तेव्हा मधल्या फळीच्या खेळाडूंवर दबाव येत नाही.' असं म्हणतं हा टीमचा विजय असल्याचे सांगितले धोनीने सांगितले. धोनीने त्याच्या नावाला साजेशी कामगिरी या मालिकेत पुन्हा एकदा करून दाखवली आणि भारताला विजयाची चव चाखवली.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा 'हेलिकॉप्टर शॉट' पाहणे ही क्रिकेट प्रेमी आणि धोनीच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. पण धोनीला हा प्रकार त्याच्या ज्या मित्रानं शिकवला तो सध्या आजारी आहे. हे समजताच धोनी त्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आपल्या मित्रासाठी हवी ती मदत देण्याची तयारी धोनीनं दाखवली आहे.

महेंद्रसिंग धोनीला 'हेलिकॉप्टर शॉट' खेळायला शिकवणा-या या मित्राचं नाव संतोष लाल आहे. संतोष लाल हा रणजी क्रिकेटपटू आहे. त्याला गंभीर आजार झाला असून सोमवारीच त्याला दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हे समजताच धोनीने माजी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांच्याकडे फोनवर त्याच्या तब्येतीची विचारणा केली. तसेच आवश्यक असेल ती सर्व मदत आपण करायला तयार आहोत, असेही धोनीने भट्टाचार्य यांना सांगितले. धोनीसोबतच अन्य मित्रांनीही संतोष लालला मदत करणार असे सांगितले आहे. त्यांनी एकत्र येऊन काही पैसेही जमा केले आहेत, असेही भट्टाचार्य म्हणाले. झारखंड क्रिकेट संघाने एक लाख रुपयाची मदत केली तर संघातील सदस्यांनी ३९,५०० रुपयांची मदत दिली आहे. धोनी संतोष सोबत रणजी ट्रॉफीत खेळला आहे आणि हेलिकॉप्टर शॉट देखील मी संतोष कडूनच शिकलो होतो, असे धोनीने सांगितले आहे.

Monday 9 September 2013

              मी राजकारणी नाही, खेळाडू आहे – सचिन तेंडुलकर


पुणे, दि. 1 (प्रतिनिधी) - राज्यसभेसाठी राष्ट्रपतींनी माझ्या नावाची केलेली शिफारस हा माझा सन्मान आहे. परंतु मी खासदारकी स्वीकारली याचा अर्थ मी राजकारणात प्रवेश केलेला नाही. मी राजकारणी नाही, तर खेळाडू आहे आणि अखेरपर्यंत खेळाडूच राहणार, असा स्ट्रेट ड्राइव्ह विक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आज लगावला.
सचिन तेंडुलकरच्या राज्यसभेवरील नियुक्तीवरून सध्या उलटसुलट वादविवाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर सचिनने आज प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. शतकांचे महाशतक ठोकल्याबद्दल पुण्यातील एका बिल्डरच्या वतीने सचिन आज जाहीर सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्रकट मुलाखतीत तो बोलत होता. शतकांची सेन्चुरी हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा क्षण नव्हता. तर भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणे हे माझे स्वप्न होते. गेल्यावर्षी ज्यावेळी भारताने वर्ल्ड कप जिंकला, तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता, असेही सचिनने यावेळी स्पष्ट केले.
राज्यसभेची खासदारकी हा माझ्यासाठी बाऊन्सर होता. खरे तर तो मोठा सन्मान आहे. लतादीदी, पृथ्वीराज कपूर यांच्यासारख्या दिग्गजांप्रमाणे राष्ट्रपतींनी माझ्या नावाची शिफारस राज्यसभा खासदारकीसाठी करावी, हा माझा गौरव आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ही संधी दिली जाते, तेव्हा तो तुमचा सन्मान असतो. त्यामुळे राज्यसभा खासदारकी मिळाल्यानंतर मला आनंद झाला. परंतु मी काही राजकारणी नाही. मी खेळाडू आहे आणि क्रिकेट हेच माझे विश्व आहे. मी क्रिकेट अजिबात सोडणार नाही. अगदी जसे शक्य आहे, तसे मी क्रिकेटसाठी योगदान देत राहीन, अशी पुस्तीही सचिनने यावेळी जोडली.
याआधी मला वायुदलाने ग्रूप कॅप्टन हा बहुमान दिला होता. पण मी अद्यापही एकदाही विमान उडवलेले नाही. तसेच मला मिळालेली खासदारकी म्हणजे काय ? हे मी नीट जाणतो. त्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव असून ती पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असेही सचिनने सांगितले. सचिन म्हणाला की, जगण्याच्या पत्येक टप्प्यावर नवनवीन आव्हाने असतात. त्यामुळे तुम्ही सदैव तणावाखाली असता. अशा तणावात काम करणे हेच कौशल्य असून मला विश्वास आहे की, अशा परिस्थितीतही माणूस १० पैकी ८ गूण मिळवू शकतो. मी तरुण पिढीला एवढेच सांगेन की, त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे. मी नववीपासून क्रिकेट खेळू लागल्याने शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. पण शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे.

Wednesday 28 August 2013

Exercise

http://sryanamaskar.blogspot.in/p/blog-page.html

व्यायामाचे महत्व

आरोग्य म्हणजे नुसता रोगांचा अभाव नाही तर आजूबाजूच्या परिस्थितीनुसार शरीर व मन कार्यक्षम असणे, आनंदी व उत्साही असणे. उत्साही मन आणि जोमदार शरीर या गोष्टींचा समावेश 'आरोग्य' या शब्दात अभिप्रेत आहे. "शरीर सुखी तर मन सुखी" या तत्वानुसार कोणतेही बौद्धिक काम यशस्वीरीत्या करण्यासाठी मनाची प्रसन्नता, सुदृढ - निरोगी शरीर आवश्यक आहे. शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत.
Health is Wealth असे नेहमी म्हणतात. पण Health is more than wealth, because wealth can change hands, health cannot.  म्हणून शरीररूपी संपत्ती राखण्यासाठी नियमित व्यायामाची नितांत गरज आहे. शरीराचे आरोग्य राखण्यासाठी नियमांनुसार सर्व अवयवांची शास्त्रशुद्ध हालचाल करण्याच्या क्रियेला 'व्यायाम' म्हणतात.व्यायामामुळे अवयवांची ताकद वाढते. विशिष्ट प्रकारच्या व्यायामामुळे अवयवांच्या प्रमाणबद्धतेला म्हणजेच सौष्ठवाला मदत होते. सुडौल बांधा म्हणजे सौष्ठव. 
व्यायाम हि सुखी, निरोगी दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर- मनाचा निभाव लागावा, संकटांशी सामना करण्यासाठी शक्ती -जिद्द प्राप्त व्हावी यासाठी व्यायामाचा मंत्र जपायला हवा. अगदी रानटी अवस्थेपासून ते आजच्या आधुनिक जगात माणूस आधी स्वसंरक्षणाचा विचार करतो. त्यासाठी शारीरिक ताकद हवी. उत्तम आरोग्य लाभलेल्या माणसापासून सर्व संकटे दूर पळतात. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात - "शक्तीने पावती सुखे ... शक्ती नसता विटंबना... शक्तीने नेटका प्राणी ... वैभव भोगता दिसे.
कोण किती व्यायाम करतो यापेक्षा किती नियमितपणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वतःच्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशिर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पिळदार दिसते खरे पण अशा पीळदार शरीरयष्टीवाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोलामोलाची असते. त्यांची बौद्धिक क्षमता बेताची असते.
लहानशा अपघाताने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेकवेळा बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टीकोनातून याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांसधातूच्या पोषणासाठी वापरले जातात. परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते.
थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानांपेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात. नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुदृढ आणि बलवान होतात तसेच बुद्धीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. 
शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवांची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते. त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुद्धीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजेत. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे तो कधीही न विसरण्याइतका पक्का होतो. यालाच बुद्धीचा व्यायामही म्हणता येईल
 हसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळणहसून हसून गडबडा लोळण