Tuesday 24 December 2013

अभ्यास कसा करावा?

अभ्यास कसा करावा?
आपण ज्यांना टीनएजर्स असे संबोधतो किंवा कीशोरवयीन मुलं म्हणतो- म्हणजे १३ ते १८ या वयोगंटातील मुले व अभ्यासांचा कंटाळा करणारी. मुले यांना वीचारले तर तीना इच्छा वीचारल्यात तर मी देखील सांगेन- परीक्षा, अभ्यास नावांचे राक्षस.

शिक्षकांनी आमच्याशी मीत्राम्रपाणे वागावे आणि शाळेत जाणे म्हणजे पिकनीक ला गेल्या सारखे वाटणे असे १४ वर्षाची सरीता सांगते.

सर्वसाधारणपणे किशोरवयीन मुले अभ्यांसाचा कंटाळा करतात.अभ्यास न करण्याची कारणे ती शोधत असतात. "माझ पोट आज दुखतंय मला आज बर वाटंत नाही किंवा मला सगळ येतयं. वैगरे बहुतेक वाक् आईवडीलांना आपल्या मुलांकडुन ऎकायला मिळतात.

खुप अभ्यास करुन परीक्षेत चांगले यश मिळवणे हे मुलांच्या योग्य वाढीचे द्योतक आहे. अभ्यास न करणारी मुले आणि त्यांना अभ्यांसाला जबरदस्तीने बसवणारी पालक मंडळी या दोघांच्या वादविवादाने घरांच वातावरण पार बिघडुन जाते. म्हणुनच मुले का अभ्यास करत नाहीत, याची कारणे आपण अभ्यासली पाहीजेत.

१. अभ्यास करणे हे मुलांना कंटाळवाण वाटतं.बऱ्याचदा अभ्यासक्रम भरपुर असतो आणि अ अभ्यास आणि आपल्याला एवढा प्रंचड अभ्यास करायचा आहे, हे पाहुनच मुलांचा अभ्यासातला रस संपतो.

२. आमचे शिक्षक आम्हाला निट शिकवत नाहीत. किशोरवयीन मुलांना शिकवण्यात येणारे अनेक विषय असतात. ते योग्य रीतीने शिकवले तरच मुलांना रस वाटतो.

३. पाठांतराचा तीटकारा- अनेक मुले न समजताच धडाधड पाठंतर करतात. पण मध्येच एखादा विषय शब्द कींवा वाक्य विसरल तर प्रश्नाला उत्तर देणं त्यांना कठीण जातं. त्यामुळेच त्यांना परीक्षेत कमी मार्क मीळतात. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी लागणारा आत्मवीश्वास ते गमावतात.

४. अभ्यास करणे महत्वाचे आहे असं मला वाटंत नाही. बऱ्याच मुलांना अभ्यासांच महत्वच पटलेल नसतं.पालकांना वाटत असंत की, आपल्या मुलानी अभ्यास का करायचा हेच माहीत नसंत. आणि हेच माहीत नसल्याने त्यांचे अभ्यासांत लक्ष लागंत नाही.

५. "माझे आई-वडील माझ्याकडुन अति अपेक्षा करतात." अस अनेक मुलं म्हणतात. आई-वडीलांच्या अति अपेक्षामुळे मुलांवर दडपण येतं. मुले एकाग्र बनु शकत नाहीत. (या ठीकाणी सद्या चालु असलेल्या ’घरोघरी’ या उत्क्रुष्ट नाट्काची सहजच आठवंण यावे.)

६. काही वेळा मीत्रांच्या संगतीने , आई-वडील घटस्फोटीत आहेत, व्यसनी आहेत , एकमेंकाशी सतत भांडत असतात, मुलांला देखील सतत मारहाण करत असतात, त्याने मुलं अभ्यासात मागे पडतात.

७. काही वेळा मीत्रांच्या संगतीने अभ्यास करण्यांच मुलं टाळतात. अभ्यास आपल्या मीत्राला आवडत नाही, म्हणुन त्यांना पण आवडत नाही. कारण आपण जर का अभ्यास मधे रस दाखवला तर ग्रुप मधे बाहेर फेकले जावु अशी त्यांना भीती असते. 

अभ्यासांने प्रत्येक व्यक्त्तीचा मनाचा, बुध्दीचा मोठया पमाणावर विकास होतो.आपल्या आजुबाजुच्या वातावरणांची माहीती होते, ते समजुन घेता येते. स्व:ताच्या प्रगतीसाठी अभ्यासाची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणुन किशोररवयात हे अभ्यास तर भरपुर करतात. पण त्यानी त्यांचा अभ्यास कसा करतात याचा नोंदी पण दीलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना आपला अभ्यास नक्कीच सुधारता येईल.

१. तुमचे अभ्यासाचे टेबल, टीव्ही, स्वयंपाकघर हे ट्रँफिक्च्य आवाजापासुन दुर असायला हवे. टेबलावर काँमीक्स व गोष्टीची पुस्तके नसावीत.

२. शक्य असेल तर अभ्यासाची एक ठरावीक वेळ असावी, म्हणजे त्या वेळेत अभ्यासात तुमंच मन एकाग्र होण्यास मदत होईल. रविला रात्री दहानंतर अभ्यास करायला आवडतं. कारण त्यावेळी सर्वजण झोपलेले अस्तात आणि सर्वत्र शांतता असते.

३. सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती ४५ मीनीटं ते १ तास एकाग्र राहु शकते. त्यानंतर एकाग्रता भंग होवु लागते. म्हणजेच जेव्हा एखादा किशोर वयीन मुलगा एकच पाठ एक तासापेक्षा जास्त वेळ वाचत असतो. तेव्हा त्याची स्मरण करणे त्याला कठीण जांत. त्याही पेक्षा जेव्हा मुलगा तीन तास सलग अभ्यास करीत असतो. तेव्हा त्यांची स्मरण्शक्त्ती कमी होते. आणि तो अधिक विस्मरणशील होतो . म्हणुनच कीशोरयीन मुलांनी सर्वसाधारणपणे तासभरच अभ्यास करायला हवा. त्यानंतर १०-१५ मीनिटांचे मध्यंतर घेऊन मग पुन्हा अभ्यासाला सरुवात करावी. यामुळे स्मरणशक्ती ताजीतवानी राहते आणि अभ्यासक्रम चटकन लक्षात यायला मदत होते.

४. छोट्या मंध्यतराप्रमाणे मुलांनी काही काळ खेळण्यात, मीत्रांशी गप्पा मारण्यात, टीव्ही बघण्यात घालवला पाहीजे. यामुळे मुलांना जीवनावीषयी आस्था वाटते आणि अभ्यास करताना उस्ताह येतो.

५. रोज अभ्यास करायची सवय ठेवा, म्हणजे परीक्षेच्या वेळी ताण जाणवार नाही.

६. एखादा धडा वाचताना तो नेमका कशाबद्दल आहे ते जाणुन घ्या.त्यातील मुद्याची शीर्षके, धड्याची प्रस्तावना आणि सारांश नीट वाचा. यामुळे धड्याची नीट ओळख होते.

७. वाचुन झाल्यांनंतर पुस्तक बंद करुन, तुम्ही जे वाचंल आठवण्याचा प्रयत्न करा. केलेला अभ्यास लिहुन काढणे सर्वात उत्तम. त्यामुळे तुम्ही तुमची उत्तरे आधीक चांगल्या तर्हेने लीहु शकता. आणि तुमचा गोंधळ उडत नाही. शिवाय लीखाणामुळे तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहतो. शिकण्याची क्षमता ही माणसाला मीळालेली महान देणगी आहे. तिचा उपयोग करा. आणि आयुष्यात यशस्वी व्हा.

परीक्षेचा अभ्यास आणि एकाग्रता

परीक्षेचा अभ्यास आणि एकाग्रता

परीक्षा जवळ येत चालल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येत नाही. एकाग्रता म्हणजे सोप्या शब्दात सर्व ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे.

अभ्यास करताना ज्ञानेन्द्रीयान्द्वारे माहिती स्वीकारली जाणे.ती मेंदूत साठवली जाणे. आणि आवश्यक तेंव्हा आठवून चांगल्या पद्धतीने सादर करता येणे. ह्या क्रिया चांगल्या होणे व त्यांच्यात coordination असणे, फार महत्वाचे आहे.
अभ्यासातील एकाग्रता का होत नाही तर मुख्यत: – ध्येयासक्ती नसणे, योग्य ध्येयच डोळ्यासमोर नसणे, भावनिक समस्या असणे, अभ्यास करायची मनापासून तयारी नसणे, विषयामधे रस नसणे, विषय अवघड वाटणे, शारीरिक व मानसिक थकवा असणे.
मुळात मन स्वस्थ , स्थिर नसेल तर एकाग्रता साधणं शक्य नाही. त्यासाठी मन अस्वस्थ असण्याची कारणे जी आपल्याला माहित आहेत, त्यांची एक लिस्ट करावी. विश्वासातील घरातली व्यक्ती किंवा तज्ञ ह्यांच्या मदतीने त्यांचे निराकरण करावे. जी कारणे सांगता येत नसतील, उमजत नसतील त्यांच्या निराकरणासाठी तज्ञांचे सहाय्य घ्यावे. भावनिक समस्या (emotional disorder ) किंवा अस्वस्थता असेल तर त्यासाठी देखील वेळ न दवडता तज्ञांचे उपचार घ्यावेत.
अभ्यासाला बसताना अभ्यास चांगला होईलच हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन सुरवात करावी.
अभ्यासासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे. रोजच्या अभ्यास नियोजनात साधारण ५० मिनिटे झाल्यावर पाच-दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा. त्यानंतर काही क्षण श्वासावर लक्ष ठेऊन शांत बसावे. त्यानंतर पुढचा अभ्यास करावा. अभ्यास करताना मनात इतर विचार आल्यास स्वत:ला स्टोंप इट, रिल्याक्स, बी हियर नाऊ इत्यादी स्वयं सूचना द्याव्यात. मन वर्तमान क्षणात ठेवण्यास त्याचा उपयोग होईल.
रोजच्या अभ्यासाची आखणी करताना साध्य होऊ शकेल इतपतच अभ्यासाची योजना आखावी व तो पूर्ण करावा. अभ्यास करताना सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. अभ्यासाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल परंतु S3RQ अशी पद्धत वापरून पहावी. म्हणजे जो अभ्यास आत्ता करायचा आहे प्रथम त्याचं सर्व साधारण अवलोकन(Survey), काळजीपूर्वक वाचन(Read), त्यातील महत्वाचा भाग लक्षात ठेवत उजळणी (Revise), त्यानंतर महत्वाचे म्हणजे जो अभ्यास केलाय तो समोर एक काल्पनिक व्यक्ती आहे असे मनात आणून तीला समजेल अशा पद्धतीने, पुस्तकात न बघता, मोठ्याने बोलून शिकवणे(Recite). ही गोष्ट महत्वाची का तर , आपला खरंच अभ्यास झालाय की नाही, आपल्याला समजलंय की नाही ह्याची चाचणी होते. ह्या शिकवण्यात अडलं तर मधूनच पुस्तक/नोट्स refer करायला हरकत नाही. पण आत्मविश्वास येईपर्यंत पुन्हा पुन्हा शिकवावे. ह्याने चांगल्या रीतीने लक्षात राहायला मदत होते. त्यानंतर काही कालांतराने स्वत: प्रश्न काढून उत्तरे लिहिण्याचा सराव करावा.
कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास रोज काहीवेळ करावाच. काही विषय आवडत नसतील तर त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा. माझ्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास आवश्यक आहे हे मनाला बजावावे.
एकाग्रता कमी होतेय असं वाटलं की पुढचा अभ्यास करणं काहीवेळ थांबवून, झालेला अभ्यास पुन्हा आठवावा. काही दीर्घ श्वास घेवून सावकाश सोडावे. स्वत:च्या श्वासाकडे , शरीराकडे, वेगवेगळ्या ज्ञानेन्द्रीयांना जाणवणाऱ्या संवेदनांकडे क्रमाक्रमाने त्रयस्थपणे पहावे. काहीवेळ स्वत:चा श्वास पहावा. मन अशा पद्धतीने divert व relax करावे. वाटल्यास थोड्या वेळ शारीरिक हालचाली कराव्यात, खोलीतल्या खोलीत चालावे. पुन्हा पुढच्या अभ्यासाला सुरवात करावी.
पूर्वी आपला ज्यावेळी खूप छान एकाग्रतेने अभ्यास झाला होता त्यावेळची मन:स्थिती वारंवार आठवावी व त्या धारणेने अभ्यासाला बसावे.
रोज चल पद्धतीचा व्यायाम (धावणे,वेगात चालणे, पोहोणे इ.) करणे आवश्यक आहे. ज्यायोगे मेंदूतील पेशींना मुबलक प्राणवायू मिळेल. चांगली संप्रेरके स्त्रवतील . ज्याचा एकाग्रतेवर चांगला परिणाम होईल.
चौरस, पौष्टिक आहार वेळेवर घ्यावा. भरपूर फळे, भाज्या, ओमेगा ३ युक्त, व्हिटामिन बी,सी,ए, इ,लोह युक्त पदार्थ.
रोज ओमकार करणे, थोड्यावेळ शांत संगीत ऐकणे ह्याचाही एकाग्रतेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
अभ्यास करण्याची जागा शक्यतो एकच असावी. तिथे शक्यतो मोबाईल, टी.व्ही. इत्यादींचा अडथळा नसावा. बसूनच अभ्यास करावा (पाठीचा कणा ताठ राहील अशा पद्धतीने). पलंगावर लोळत अभ्यास करू नये. पलंग ही फक्त झोपण्याची,आराम करण्याची जागा आहे.
ठरवलेला अभ्यास पूर्ण झाला तर आणि तरच स्वत:ला थोडा वेळ टी.व्ही.इ. मनोरंजनासाठी परवानगी द्यावी.
परीक्षा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न नसून, मेंदूसाठी, आपल्यासाठी, ठराविक वेळेत अभ्यास करून स्वत:ला सिद्ध करण्याची, ती एक संधी आहे हे लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यामध्ये नवीन दृष्टीकोन तयार होण्याची, विश्लेषणाची, समजून घेउ शकण्याची, लक्षात ठेवण्याची आणि चांगल्या रीतीने सादरीकरणाची, ह्या क्षमता निर्माण होण्याची ती एक संधी आहे.